Sunday, July 25, 2010

पुरंदर

नारायणपुर रोड वरुण दिसणारे पुरंदर चे अप्रतिम दृश्य.

दर वर्षी पावसाला सुरु ज़ाला की आमचा ठरलेला दिवसाच्या ट्रीचा बेत,
सह्याद्रीच्या दक्षीनोतर पसरलेल्या रांगेतुन काही फाटे पुर्व दिशेकडे फुटले आहेत . त्या पैकी एका फाटया वर सिहगड आहे. याच डोंगरावर पूर्वेकड़े अंदाजे २४ कि.मी. वर बापदेव, दिवे आणि कात्रज घटाच्या पलीकडे जो छानसा किल्ला आहे तोच पुरंदर . तीन्ही घाट ओलांडून आपन पुरंदरच्या पायथ्याला पोचु सकतो पुण्याहून अगदीच म्हणाल तर जास्तीत जास्त .३० तासाचा रस्ता . पावसाल्यात अगदी मासोप्त भिजन्यासाठी जावे म्हणाल तर पुरंदर सारखा किल्ला नाहीच .
पुरंदर वरचे एक चर्च .
पुरंदर हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारचा आहे . या गडाची समुद्र सपाटी पासून ऊँची अंदाजे १५०० मीटर आहे . पुण्यापासून जायचे म्हणले तर एस. टी. अगदी पुरंदरच्या पायथ्या पर्यंत सोडते . पुरंदर किल्ला हा अंदाजे १००० ते १२०० वर्षापूर्वीचा असल्याचा अनुमान आहे,पुरंदर म्हंजे इंद्र ,ज्याप्रमाणे इंद्र हा बलवान होता त्याप्रमाणे हा पुरंदर सुद्धा बल्याध्य आणि मजबूत आहे . पुराणात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत असे आहे .मारुतीने द्रोणगिरी पर्वत उचलून नेताना काही भाग खाली पडला तोच हा इंदानील पर्वत .


हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला .पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाईत आला . ई.स . १६४९ मध्ये आदिलशाने शहाजीराजना कैदेत टाकले , याच वेळी शिवाजी राज्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला .
बनी दरवाजा
पायथ्या पासून वर चढून गेल्या नंतर पुरंदर माचीवर जो एकमेव दरवाजा लागतो तोच बनी दरवाजा तो आजही चांगल्या स्तिथीत आहे .दरवाज्यातून आत गेल्यावर दोन रस्ते लागतात एक सरळ पुढे जातो तर एक डावीकडे मागे जातो ,सरळ पुढे गेलो तर लास्क्रा च्या बारकी दिसतात .तर उजवीकडे बाले किल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर आहे तेच पुरांदेराश्वाराचे . जवळच पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आणि त्यांच्या वाड्याचे काही आवसेस दिसतात .या वाड्यातच सवाई माधव रावाचा जन्म झाला होता .


पाण्याचे टाके

बाले किल्ल्या पासून वर गेल्या नंतर आपण दिल्ली दरवाज्य पाशी पोचतो . वर फिरत जाताना आपल्याला बरेच पाण्याचे टाके ,वाड्याचे अवशेष ,तसेच अंबरखान लागतो . अगदी शेवटी महादेवाचे मंदिर लागते ज्याचा थोरल्या बाजीरावांनी जीर्णोद्धार केला होता .


धुक्यात हरवलेला वज्रगड.
पुर्ण पुरंदर फिरण्यासाठी एक दिवस लागतो आणि आपण पुरंदर बरोबर त्यालाच लागून असलेला वज्रगड पण पाहू सकतो. तर नक्की एका दिवसाच्या ट्रिप साठी निसर्गाच्या सनिध्ह्यत जाऊन याच.
पुरंदर वरील महादेवाचे मंदिर.

Sunday, July 18, 2010

सीमाप्रश्नाविषयी थोडेसे....

अलीकडे रोज पेपर उगधला की एकच बातमी नक्की पहायला मिळेल महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न ,
"सारे विश्वची माजे घर" असे म्हाननाऱ्या संत द्यानेशवरंच्या मराठी भूमिचा हा प्रश्न . गेले बराच वर्ष हा सीमा वाद सुरु आहे . एवढेच नव्हे तर हा वाद चिघळला असून कर्नाटक सरकारतर्फे सीमाभागात राहणाऱ्या मराठीभाषकांवर अत्याचार सुरु आहेत आणि त्या साठी मुख्यमंत्री चव्हाण याना दिल्ली गाठावी लागली .

कन्नड़ कार्यकर्त्यांनी निदर्शने करताना भगव्या ध्वजाचा अवमानही केला . भगवा हातातून उडवून फेकून देण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी मजल मारली. त्यानंतर त्याचे त्यांनी दहन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे त्यांनी दहन केले. त्या निषेधार्थ विविध मराठी संघटनांनी पुकारलेल्या बेळगाव, निपाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .



एवढे सारे होत असताना केंद्र सर्कार मात्र धिम्म बसून आहे . कन्नड़ कार्यकर्त्यांनी केलेल्या नस्धुसिनी विनाकारण सामान्य जन जीवन विस्कलित होते आहे . आशा परीस्तितित जिथे केंद्र सरकारने हस्तक्षेकरायला हवा तिथे तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पथक पाठविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण याना करावी लागत आहे . मग नक्की सर्कार करत तरी काय आहे हा प्रश्न पडतो .


डॉ बाबा साहेब आंबेडकर याना सुधा मानले आहे की भारतात जी प्रान्त रचना जाली ती भाषावार प्रान्त रचना जाली , भारतात पंजाब, बिहार, ओरिसा ,बंगाल या राज्यांची भाषावार प्रान्त रचना जली असेल तर मग महाराष्ट्रची का नाही .जर बेलगाव हे मराठी भाषीकंचे असेल तर ते महारष्ट्र्रातच हवे .

कर्न्नाटक सरकार हे अगदी उघड पने मराठी लोकांवर अपला हक्क सांगत आहे . यात केंद्र सरकारने वेळीच दखल घेतली पाहिजे नाही तर उगाच पुन्हा एकदा राजकीय ,सामजिक अस्थिरता व्हायाला वेळ लागनार नाही ........